सरकारचा मोठा निर्णय ! तीन किंवा अधिक मुले असलेल्या व्यक्ती निवडणूक लढवू शकणार
दैनिक शब्दमत: Rajasthan Government: सरकारचा
मोठा निर्णय ! तीन किंवा अधिक मुले असलेल्या व्यक्ती निवडणूक लढवू शकणार
Rajasthan Chief Minister Bhajanlal Sharma
announce: “दोन मुलांच्या अटीमुळे” बहुसंख्य पालकांना निवडणूक लढण्यापासून अलिप्त राहावे लागते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ही अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी होत होती, आता या मागणीची दखल सरकारने घेतली आहे.
राजकारणात मोठा बदल
राजस्थानमध्ये पंचायत व नगरपालिका निवडणुकांसाठी दोन मुलांची अट लोकसंख्या नियंत्रणाला प्रोत्साहन देण्यासाठी लागू करण्यात आली होती. मात्र आता या नियमामुळे भेदभाव व सामाजिक असमतोल वाढल्याचे आरोप होऊ लागले आहे. हा नियम रद्द झाल्याने राज्याच्या स्थानिक राजकारणात मोठा बदल घडण्याची शक्यता आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
सध्याच्या सामाजिक व लोकसंख्याशास्त्रीय परिस्थितीत हा नियम अप्रासंगिक ठरत असल्याचे सरकारचे मत आहे. हा निर्णय ‘मिशन २०२६’ चा भाग असल्याचे मानले जात असून, ग्रामीण आणि शहरी राजकारणात व्यापक सामाजिक सहभाग वाढवणे हा यामागील उद्देश आहे, असे उत्तर सरकारच्या वतीने विधानसभेत देण्यात आले
भाजपचा आमदारांचा पाठिंबा
राजस्थानमध्ये सुमारे ३० वर्षांपासून हा नियम लागू आहे. “दोन मुलांच्या अटीमुळे” बहुसंख्य पालकांना निवडणूक लढण्यापासून अलिप्त राहावे लागते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ही अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी होत होती, आता या मागणीची दखल सरकारने घेतली आहे. हा नियम रद्द करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. भाजप आमदारांनी या निर्णयाला समर्थन दिले
दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यास मनाई करणाऱ्या तीन दशकांच्या जुन्या कायद्यात राज्य सरकारने बदल करणार आहे. त्यामुळे तीन किंवा त्याहून अधिक मुले असलेले पालकही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू शकणार आहेत.
राजस्थानच्या भजनलाल शर्मा सरकार हा निर्णय घेणार आहे. राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा हा ऐतिहासिक निर्णय घेण्याचे संकेत भजनलाल शर्मा सरकारने दिले आहेत. यामुळे तीन किंवा त्याहून अधिक मुले असलेले पालकही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू शकणार आहेत.
