अजित पवार यांच्या विमान अपघातात मृत्यू झालेल्या कॅप्टन सुमित कपूर यांच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कॅप्टन सुमित कपूर हे त्या दिवशी मूळतः या विमानाचे वैमानिक नव्हते, असा दावा त्यांच्या मित्रांनी केला आहे.
दिल्लीतील त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी बोलताना मित्रांनी सांगितले की, कॅप्टन कपूर काही दिवसांपूर्वीच हाँगकाँगहून भारतात परतले होते. अपघाताच्या काही तास आधीच त्यांना हे विमान उडवण्याचे आदेश देण्यात आले. वाहतुकीमुळे मूळ वैमानिक उशिरा पोहोचल्याने, कॅप्टन कपूर यांनी त्यांची जागा घेतली, असे सांगण्यात आले.
दिल्लीस्थित खासगी विमान कंपनीचे लेअरजेट 45 हे विमान सकाळी सुमारे 8 वाजता मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. निवडणूक प्रचारासाठी अजित पवार यांना घेऊन जाणाऱ्या या विमानाने बारामती विमानतळावर उतरण्याचा दुसरा प्रयत्न करत असताना सकाळी सुमारे 8.45 वाजता अपघात झाला.
या भीषण अपघातात विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला.
दरम्यान, कॅप्टन कपूर यांच्या एका मित्राने सांगितले की, अपघातानंतर त्यांचा मृतदेह त्यांनी घातलेल्या हातातील ब्रेसलेटमुळे ओळखता आला. तर दुसऱ्या मित्राने सांगितले की, त्यांच्या निधनाची बातमी स्वीकारणं अत्यंत कठीण होतं. एका निकटवर्तीय सहकाऱ्याने सांगितले की, हाँगकाँगहून परतल्यानंतर त्यांची कॅप्टन कपूर यांच्याशी फोनवर चर्चा झाली होती. त्या वेळी कॅप्टन कपूर यांनी त्यांना स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. जगभरातील माहितीसाठी
.
.
.
Dainik Shabdmat Maharashtra news Marathi news
