मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

महायुती सरकार कोसळणार? वाल्मीक कराडचं नाव घेत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

On: February 21, 2026 6:18 PM
Follow Us:
---Advertisement---

 

Mahayuti Government Collapse Valmik Karad Claim: बुलढाण्यातील चिखला गावातील घटनेवरून वातावरण तापले असताना मनोज जरांगे पाटील यांनी वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावरून महायुती सरकार कोसळण्याचा इशारा दिला आहे.

 

सरपंच संतोष देशमुख हत्येचा मुख्य आरोपी वाल्मीक कराडने जामीन अर्ज दाखल केला आहे. यावर जरांगे म्हणाले, खूनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी बाहेर राहू शकत नाहीत, तो कोर्टात गेला काय आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जरी गेला तरी त्याला सुट्टी नाही. जामीन मंजूर झाल्यास सरकार टिकेल का, असा इशाराही त्यांनी दिला. ज्या दिवशी वाल्मीक कराडचा जामीन होईल त्याच दिवशी सरकार पडेल, असा दावा त्यांनी केला.

याशिवाय काही जण गुंडगिरी, बोगस लाभार्थी आणि राजकीय फायद्यासाठी काम करत असून त्यामुळे समाजाची बदनामी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित टोळीमुळे जात बदनाम होत असल्याचे सांगत समाजाने अशा प्रवृत्तींपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेलाही त्यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांच्या निधनाची सर्व कुटुंबाला शंका असल्यास सखोल तपास व्हायलाच हवा. मात्र, गमावलेला व्यक्ती परत येणार नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

 

दरम्यान, दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख प्रकरणावर बोलताना जरांगे पाटील यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे ते म्हणाले. जामीन, पीकविमा आणि इतर प्रकरणांमध्ये संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच महादेव मुंडे आणि सहआरोपींची नार्को टेस्ट करण्यात यावी असेही त्यांनी स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment