अयोध्येत आयोजित करण्यात आलेल्या महायज्ञात भीषण आग लागली आहे. नारळ फुटताच आग लागली. ही आग काही मिनिटांत मंडपात पसरली. त्यामुळे मंडप जळून खाक झाला.
अयोध्या दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
यज्ञ मंडपात अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग त्वरित नियंत्रणात आणली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांनी दिली. आगीची घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. गेल्या ९ दिवसांपासून महायज्ञ सुरु होता. आज महायज्ञाचा अखेरचा दिवस होता. त्यामुळ गर्दी कमी होती.
या महायज्ञाच्या कार्य भाविक सहभागी झाले होते. अखेरच्या दिशा हवन कुंड तयार करण्यात आले होते. या यज्ञांमध्ये ५ हजार जणांनी मंत्रोच्चारण करुन आहुती दिली. ज्यावेळी आग लागली,
Ayodhya Fire Tragedy:
महायज्ञात आग, नारळ फुटताच मंडप जळून खाक; राम मंदिरापासून हाकेच्या अंतरावर अग्नितांडव
Ayodhya Fire Tragedy: अयोध्येत आयोजित करण्यात
आलेल्या महायज्ञात भीषण आग लागली आहे. नारळ फुटताच आग लागली. ही आग काही मिनिटांत मंडपात पसरली. त्यामुळे मंडप जळून खाक झाला.
अयोध्याः उत्तर प्रदेशातील अयोध्येत शनिवारी मोठी दुर्घटना घडली. शरयू नदीच्या तीरावर महायज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं असताना आगीची घटना घडली. आगीच्या ज्वाळा वेगानं पसरल्या. त्यामुळे मंडप जळून खाक झाला. या महायज्ञात सहभागी होण्यासाठी जवळपास ५० हजार जण आले होते. आग लागताच एकच खळबळ उडाली आणि सगळ्यांचीच पळापळ सुरु झाली. अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी आग नियंत्रणात आणली. यज्ञात आहुती म्हणून अर्पण केलेला नारळ फुटल्यानं दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.











