पावसाचा खंडात सीताफळ बागेची घ्यायची काळजी
पावसाचा खंड पडल्यास सीताफळाच्या झाडांवरील कळ्या, फुले आणि लहान फळे गळण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत पुढील उपाय उपयुक्त ठरू शकतात:
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग
सोयगाव : ठिबक किंवा उपलब्ध साधनांनी हलके व नियमित सिंचन करून जमिनीत ओलावा कायम ठेवा.
झाडाच्या बुंध्याभोवती सुकलेले गवत, ऊसाचा पाचोळा किंवा प्लास्टिक मल्च टाकून जमिनीतील ओलावा टिकवा.
तण नियंत्रण करा, कारण तणही जमिनीतील पाणी शोषून घेतात.
पाणी साचू देऊ नका आणि झाडांवर अनावश्यक ताण येणार नाही याची काळजी घ्या.
फुलधारणा व फळधारणा टिकवण्यासाठी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार फवारणी करा.
झाडांची नियमित पाहणी करून कीड व रोगांचा प्रादुर्भाव दिसताच योग्य नियंत्रण करा.
जोरदार छाटणी किंवा अतिरिक्त खतांचा वापर टाळा; संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करा.
हवामानाचा अंदाज लक्षात ठेवून सिंचनाचे नियोजन करा.
योग्य वेळी ओलावा उपलब्ध करून दिल्यास कळ्या व लहान फळांची गळ कमी होण्यास मदत होते आणि उत्पादनावर होणारा परिणामही कमी करता येतो…..कृषी भूषण अरुण श्रीराम सोहनी







