वारं फिरलं..! मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदे गटाला धक्का; 15 माजी नगरसेवक उद्धव ठाकरे गटात परतणार?
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या
पार्श्वभूमीवर शिवसेनेत पुन्हा एकदा हालचाली तीव्र झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण २०१७ मध्ये शिंदे गटात गेलेले १५ माजी नगरसेवक उद्धव ठाकरे गटात परतण्याच्या तयारीत आहेत.
मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत पुन्हा एकदा हालचाली तीव्र झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण २०१७ मध्ये शिंदे गटात गेलेले १५ माजी नगरसेवक उद्धव ठाकरे गटात परतण्याच्या तयारीत आहेत.
ठाकरे गटातील आमदार आणि खासदारांच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असून, या नेत्यांना पक्षात पुन्हा सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही हालचाल शिंदे गटाच्या मुंबईतील ताकदीवर परिणाम करू शकते. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एकूण ४६ माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता. यापैकी १५ जण आता परतण्याच्या मनस्थितीत आहेत आणि त्यांनी ठाकरे गटाशी संपर्क साधला आहे. ठाकरे गटाने या नेत्यांना स्वीकारण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, लवकरच औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. ही हालचाल BMC
कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ अद्यापही जुळलेली नाही. यामागची कारणे काही वेगळी असू शकतात. पण नाना आमदार होते तेव्हा आपलं कोणतंही काम चटकन व्हायचं, नाना आपल्याला ओळख दाखवायचे. आपुलकीने विचारपूस करायचे, पण आता त्यांच्या कथित वारसदारांकडून घोर निराशा होत असल्याची भावना पसरत चालली आहे. याचा फायदा जालन्याचे विद्यमान खासदार कल्याण काळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी उचलायला सुरुवात केली आहे. निराश कार्यकर्त्यांना गळाला लावण्याचे काम कल्याण काळे यांचे कार्यकर्ते करत असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
सध्या मतदारसंघात चाललंय काय?
सध्या फुलंब्री मतदारसंघात कोणती विकासकामे होत आहेत आणि त्या कामांचा दर्जा काय, यावर बरीच चर्चा घडून येत आहे. हरिभाऊ बागडे आमदार असताना सातत्याने विकासकामांचा प्रवाह मतदारसंघात वाहत होता, तो आता दाखवण्यापुरताच दिसून येत आहे. कार्यकर्त्यांना नानांची आठवण वारंवार येत आहे. पण नाना राजस्थानचे राज्यपाल असल्याने त्यांच्यापर्यंत आपले गाऱ्हाणेही कार्यकर्ते मांडू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे असंतोष व्यक्त करण्यापलिकडे त्यांच्याही हातात काही राहिले नाही. अनुराधा ताई यांनी संपर्क कार्यालयात नानांची मोठी खुर्ची तशीच ठेवून बाजूला स्वतःची छोटी खुर्ची टाकली, पण नानांचे गुण त्यांच्यात कधी उतरणार, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.