राज्यात सर्वाधिक बोगस
रजिस्ट्रीचे ‘केंद्र’ बनले छत्रपती संभाजीनगर
छ संभाजीनगर दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
रजिस्ट्रीचे गुन्हे छत्रपती संभाजीनगर शहरात उघडकीस येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरात महिन्याकाठी होणाऱ्याय तीन हजार रजिस्ट्रपिकी तब्बल दोन हजार रजिस्ट्री या सव्हर डाऊनचे कारण देत ऑफलाईन पद्धतीने होत आहेत. याच पळवाटेचा फायदा घेत भूमाफिया परस्पर तोतया व्यक्ती उमे करून जमिनी हडपत आहेत.
Chhatrapati Sambhajinagar |
अल्पवयीन
लुटारू… चेन स्नॅचिंग.. शहरात रात्रीचा थरार! नागरिक
दहशतीत
या गंभीर प्रकारांची दखल घेत. आधार पडताळणीशिवाय कोणतीही रजिस्ट्री करू नये, अशी बाब पोलिस आयुक्त प्रौण पवार यांनी राज्याचे पोलिस महासंचालक आणि नोंदणी महानिरीक्षक यांच्या नुकताच झालेल्या बैठकीत निदर्शनास आणून दिली. त्यावर हा प्रयोग संभाजीनगरात राबवावा, अशा सूचना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले-
शहरातील अनेक नागरिक देश-विदेशांत वास्तव्यास आहेत. अशा लोकांची माहिती काढून काही टोळ्या त्यांच्या जागी तोतया व्यक्ली उभी करून थेट त्यांच्या कोट्यवर्षीच्या जमिनीचे व्यवहार करून घेत असल्याचे समोर आले आहे. नुकताच हितपूर रोशील कोट्यवधी रुपयांची जमीन टोळीने बोगस हिबानामा करून हडपाण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
अधिकान्यांची बैठक घेऊन कामकाजाची पद्धत समजून घेतली, यावेळी अधिकाऱ्यांनी सव्व्हर प्रॉब्लेम आणि गर्दीचे कारण पुढे केले. यावर आयुक्तांनी इतर राज्यांत ऑफलाईन रजिस्ट्री होते का, अशी विचारणा केली. अधिकाऱ्यांनी दिल्ली पॅटर्नची माहिती देताना सांगितले की, तिहो ऑनलाईन आपण आल्यास जमीन मालक आणि साक्षीदार यांच्या ओळखपुराव्यांची तीन दिवस ऑफलाईन पडताळणी करूनच रजिस्ट्री केली जाते. हाच दिल्ली पेंटर्न छत्रपती संभाजीनगरमध्येही अवलंबावा, जेणेकरून बोगस रजिस्ट्रीचे प्रकार टळतील, अशी सूचना पोलिस आयुक्तांनी केली.
३५० एजंटांची कुंडली तपासणार
रजिस्ट्री कार्यालयाच्या परिसरात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करणारे सुमारे ३५० एजेंट कार्यरत आहेत. मात्र, यापैकी कुणाचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात नाही बोगस व्यवत्ती उमे करण्यात काही टोळ्या या एजंटांचा गैरफायदा घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता या सर्व एजंटांची पोलिसांकडून कसून पडताळणी (व्हेरिफिकेशन) केली जाणार आहे.







