मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

सहा. दुय्यम निबंधक सय्यद रसूल यांच्यावर वरदहस्त असल्यामुळेच कारवाईस टाळाटाळ करण्यात येत आहे की काय ?

On: March 9, 2026 7:24 PM
Follow Us:
---Advertisement---

सहा. दुय्यम निबंधक सय्यद रसूल यांच्यावर वरदहस्त असल्यामुळेच कारवाईस टाळाटाळ करण्यात येत आहे की काय ?

 

‘शासकीय यंत्रणेचा वापर करून कारवाई करण्यात यावी’

 

छत्रपती संभाजीनगर  दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

शहरातील रजिस्ट्री कार्यालयात बोगस

एन.ए. (अकृषिक) आदेशांच्या आधारे नियमबाह्य जमीन दस्तनोंदणी करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असल्याचे समोर आला आहे. या प्रकरणी सहायक दुय्यम निबंधक सय्यद रसूल यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी भिमशक्ती सामाजिक संघटनेने केली आहे.

 

या गैरप्रकारात सह जिल्हा निबंधक विवेक गांगुर्डे यांच्या भूमिकेचीही सखोल चौकशी कराबी, बोगस एन.ए. दस्तनोंदणी प्रकरणात भ्रष्ट अधिका-यांवर कारवाई नाही तर बेमुदत उपोषण करू असा भिमशक्तीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. मीनाताई मोहन काकडे यांनी

 

संघटनेच्या वतीने दिला आहे.

 

सय्यद रसूल यांच्यावर सह. जिल्हा निबंधक विवेक गांगुर्डे यांचा हात असल्याची रजिस्टी कार्यालयात जोरदार चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी नाय न सांगण्याच्या अटीवर ‘अट्टल मत’ला दिली होती. यावर सविस्तर वृत्त प्रसिद्धही ९ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले होते. सहा. निबंधक सय्यद रसूल यांच्यावर कारवाई करण्यास संबंधित अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. अट्टलमतच्या पत्रकारांनी या प्रश्नी सह. जिल्हा निबंधक विवेक गांगुर्डे यांनी या प्रकरणी चौकशी कुठपर्यंत आली आहे. याची विचारणा केली असता त्यांनी कारवाईवर उत्तर न देता उलट टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले. ते म्हणाले की, तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते आम्हाला द्या, आम्ही त्याच्यावर कारवाई करतो असे विवेक

 

गांगुर्डे यांनी सांगितले. पत्रकारांनी आपले काम केले आहे आता साहेब तुम्ही त्यावर कडक कारवाई करून आपल्या कार्यालयाचे नाव गदनाम होण्यापासून वाचवावे असे आम्हाला वाटते. पत्रकारांनी सांगितले की, साहेब आम च्यापेक्षा तुम्हालान भास्त माहिती लवकर त स्पष्टपणे मिळू शकते, आम्ही हे प्रकरण समोर आणले आहे. त्यामुळे आम्ही पुरावे देण्यापेक्षा तुम्ही त्यात वास्तीत जास्त लक्ष पालून कारवाई करावी असे वाटते. आम्हाला काय करायचे ते आम्ही करू, परंतु त्यात जास्त वेळ लागेल सर्व कागदपत्रांची आम्हाला चाचपणी करावी लागेल तरच कारवाई करू शकतो असे सह. जिल्हा निबंधक विवेक गांगुर्डे यांनी सांगितले. मात्र त्यांच्या याभूमिकेमुळे अजूनही किती बोगस नियमबाह्य जमीन नों दणी होईल ते मात्र सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. ती योग्य नाही,

 

छत्रपती संभाजीनगर दस्त नोंदणी कार्यालयात

 

‘दलालराज’चा आरोप;

 

छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा निबंधक (दस्त नोंदणी/रजिस्ट्री) कार्यालयात कथित गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एका संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आ दिवसांत ठोस कारवाईची मागणी केली आहे.

 

माहिती अधिकारातून २०२१ मध्ये सुमारे १६ हजार बोगस दस्त नोंदणी झाल्या दावा समोर आला होता. बोगस कागदपत्रांवर नोंदणी, टुकडाबंदी कायद्याचे उत्तम तसेच दलाल-अधिकारी संगनमताच्या तक्रारींमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाल्य संघटनेचे म्हणणे आहे. जमीन खरेदी-विक्री व्यवहारासाठी दलालांशिवाय काम नसल्याची भावना नागरिकांत पसरली आहे. अधिकृत शुल्क भरूनही हजारो रुपया अतिरिक्त वसुली होत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. सोयगाव, सिल कन्नड, गंगापूर, खुलताबाद, वैजापूर, पैठण व फुलंब्री तालुक्यातील कार्यालयांमध् अशीच स्थिती असल्याचा दावा करण्यात आला आहे. कार्यालय दलालमुक्त घो करणे, बोगस नोंदणींची स्वतंत्र चौकशी, सीसीटीव्ही व टोकन प्रणाली सुरू आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. आठ दिवसांत कारवाई न झाल्यास अ उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे

अमरण उपोषणाचा इशारा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment