मतदार यादी कामात हलगर्जी; १३७ बीएलओंना दिली नोटीस७ दिवसांत काम पूर्ण न केल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल
प्रतिनिधी । छत्रपती संभाजीनगर
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
मतदार यादी विशेष पुनरिक्षण (एसएसआर) प्रक्रियेत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील १३७ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. दिलेली कामे सात दिवसांत पूर्ण करून त्याचा ल अहवाल सादर करावा, अन्यथा तात्काळ निलंबन आणि विभागीय चौकशी केली जाईल, असा सज्जड दम जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, सध्या मतदार यादीच्या पूर्वतयारीत मतदारांचे मॅपिंग, अस्पष्ट फोटो अपडेट करणे आणि डेमोग्राफिकल सिमिलर
23 मार्चपर्यंतची मुदतः फौजदारी गुन्ह्याची टांगती तलवार
या नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे, नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसांत म्हणजेच २३ मार्चपर्यंत सर्व प्रलंबित कामे पूर्ण करणे अनिवार्य आहे. कर्तव्याचे पालन न केल्यास ‘आरपी अॅक्ट’ नुसार फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो, ज्यामध्ये ३ महिने ते २ वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे. ही नोटीस ‘अंतिम चेतावणी’ समजून तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एन्ट्रीज (एकाच नावाच्या नोंदी) दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेत अनेक अधिकारी टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी या नोटीसा बजावल्या.









