मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

दोन दिवसांपासून पावसाची हजेरी; खरिपाच्या पेरण्यांना वेग, शेतकरी सुखावला

On: June 30, 2026 9:35 PM
Follow Us:
---Advertisement---

जाफ्राबाद तालुक्यात वरुणराजाचे जोरदार आगमन; पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग

 

दोन दिवसांपासून पावसाची हजेरी; खरिपाच्या पेरण्यांना वेग, शेतकरी सुखावला

 दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

जाफराबाद प्रतिनिधि : मोहम्मद बाईयाश

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाफ्राबाद तालुक्याला वरुणराजाने अखेर दिलासा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून टेंभुर्णी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. अनेक गावांमध्ये बुधवार रात्रीपासून रिपरिप सुरू असून “काया मातीत मातीत… तीफन चालते…!” या ओळींप्रमाणे शेतशिवारात बैलजोडीच्या साहाय्याने पेरणीची लगबग सुरू झाली आहे.

 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस पाऊस कायम राहणार आहे. त्यामुळे खरिप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग व उडीद या पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. पावसाने हजेरी लावताच टेंभुर्णी व जाफ्राबादच्या बाजारपेठेत बियाणे, खते व औषधांच्या दुकानात शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. ट्रॅक्टर, नांगर व इतर शेती अवजारांच्या दुरुस्तीच्या कामांनाही गती आली आहे. टेंभुर्णी परिसरातील शेतकरी

कृषी विभागाचे आवाहन

 

शेतकऱ्यांनी पेरणी करताना बियाण्यांवर प्रक्रिया करावी, एकरी बियाण्याचे प्रमाण योग्य ठेवावे आणि पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी करावी. बनावट बियाणे व खते खरेदी करताना काळजी घ्यावी आणि अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा, असे आवाहन जाफ्राबाद तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे विकास जाधव यांनी केले आहे.

 

बैलजोडी जुंपून तीफन चालवण्याचे काम सुरू होते. “पेरणीयोग्य पाऊस झाला की मातीचा वास येतो. तो वास आला की शेतकऱ्याचा जीव भांड्यात पडतो. दोन महिने डोळे लावून बसलो होतो, आता बळीराजा कष्टाला लागला,” अशी भावनिक

 

प्रतिक्रिया अमोल देशमुख यांनी आमच्या वृत प्रतिनिधीशी बोलताना दिली

 

टेंभुर्णीचे शेतकरी संतोष औटी यांनी सांगितले की, नदी-नाले कोरडे पडून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता. मात्र या पावसाने शेतीला जीवदान मिळाले

 

असून गावातील विहिरींची पाणी पातळी वाढण्यास मदत होईल व यंदा विक्रमी उत्पन्न मिळेल.

 

महिला शेतकरी सुनिता अंभोरे म्हणाल्या की, गेल्या वर्षी पाऊस लांबल्याने दुबार पेरणीचे संकट आले होते. यंदा वेळेवर पाऊस आल्याने बियाणे आणि खत घेऊन शेतात उतरलो असून मुलाबाळांसाठी दोन घास सुखाचे मिळतील. तर शेतकरी फकिरबा सोनसाळे हे सर्जे राजाला तिफनावरील चाड्यावर मूठ धरून गाणे गात पेरणी करत असल्याचे उत्साहवर्धक चित्र शिवारात पाहायला मिळाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

जिल्हा परिषद शाळेचा ऐतिहासिक निकाल! 8 पैकी 7 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक मेहनत, जिद्द आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाने मिळवले यश -विद्यार्थी व पालकांचा सत्कार

कुंभारझरी येथील वारकरी धर्म संकिर्तन सेवा प्रतिष्ठानला निर्मल दिंडी पुरस्कार २०२६जाहीर.

टेंभुर्णी येथील राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात साजरी*

टेंभुर्णी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार; कर भरूनही नागरिकांना कागदपत्रांसाठी हेलपाटे ग्रामसेवकासह पर्यायी अधिकारीही गैरहजर; स्वच्छता, पाणीपुरवठा व प्रशासकीय कामांवर परिणाम

जाफराबाद (प्रतिनिधी): जाफराबाद ते जळगाव ही एसटी बससेवा पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी जाफराबाद शहरातील व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment