मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

टेंभुर्णीचा बस स्टैंड की केवळ कागदावरचा भुलभुलय्या?’ पुढाऱ्यांनो, आमच्या हक्काचा बस स्टँड कधी मिळणार? जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी जनतेचा संतप्त सवाल

On: July 15, 2026 8:37 AM
Follow Us:
---Advertisement---

टेंभुर्णीचा बस स्टँड की केवळ कागदावरचा भुलभुलय्या?’पुढाऱ्यांनो, आमच्या हक्काचा बस स्टँड कधी मिळणार? जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी जनतेचा संतप्त सवाल!

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

जाफराबाद प्रतिनिधी मोहम्मद बाईयाश

“आले किती, गेले किती… सत्ताधाऱ्यांची बोलण्याची किमयाच न्यारी, आश्वासनाची नुसती लागलीया भारी!” हीच आज जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यात येणाऱ्या टेंभुर्णी गावाची खरी शोकांतिका बनली आहे. महाराष्ट्रात एकीकडे विकासाच्या मोठ्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे मात्र टेंभुर्णी येथील हजारो प्रवाशांच्या नशिबी केवळ ‘नावालाच बस स्टँड’ उरले आहे. येथील मुख्य बस स्थानक म्हणजे केवळ एक ‘भुलभुलय्या’ बनले असून, प्रत्यक्षात प्रवाशांना तासन्तास महामार्गावर, उघड्यावर आणि उन्हा-पावसात एसटीची वाट पाहत उभे राहावे लागत आहे.

या गंभीर समस्येकडे थेट जालना जिल्ह्यातील खासदार व आमदार आणि परिवहन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आता टेंभुर्णीकर अधिक आक्रमक झाले आहेत.

नेत्यांची आश्वासने हवेत; प्रत्यक्षात मात्र रस्त्यावर उभे राहण्याची वेळ!

टेंभुर्णी हे जाफ्राबाद तालुक्यातील एक महत्त्वाचे आणि मोठ्या लोकसंख्येचे गाव मोठी बाजारपेठ आहे. येथून रोज शेकडो विद्यार्थी, नोकरदार, महिला आणि वृद्ध रुग्ण प्रवासासाठी बाहेर पडतात. परंतु, गावातील बस स्टँडची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की, ‘बस स्टँड कधी कोणाला दिसलाच नाही’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रवाशांसाठी शेड नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, की बस गाड्या थांबण्यासाठी योग्य जागा नाही.

निवडणुका आल्या की सर्वच पक्षांचे पुढारी येतात, मतांचा जोगवा मागतात आणि “लवकरच भव्य बस स्थानक उभारू” असे आश्वासन देऊन निघून जातात. मात्र, सत्ता हाती आल्यावर या नेत्यांची ‘बोलण्याची किमया’ संपते आणि आश्वासनांची नुसतीच खैरात उरते. आजपर्यंत अनेक सत्ताधारी आले आणि गेले, पण टेंभुर्णीकरांचे हाल संपलेले नाहीत.

“जिथे पैसा, तिथेच दुनियादारी?” जनतेचा पुढार्‍यांवर तीव्र संताप

“विकले जात आहे सगळे पुढारी, तुम्हा आमच्यासारख्यांची तिथे कुठे बात भारी! अहो जिथे पैसा आहे, तिथे सगळी दुनियादारी!” अशी संतप्त भावना आता गावातील सुजाण नागरिक आणि तरुणांमधून व्यक्त होत आहे. सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत हक्कांकडे दुर्लक्ष करून केवळ राजकीय स्वार्थ साधणाऱ्या पुढार्‍यांविषयी आता मतदारांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. विकासाच्या नावाखाली सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे हे राजकारण आता थांबले पाहिजे, अशी मागणी जोर धरत आहे.

मुख्यमंत्र्यांपर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी मतदानाचा हक्क दाखवण्याचा इशारा!

“का मतदान करता, तुमचा हक्क दाखवा जगास सारी!” हाच नारा आता टेंभुर्णी गावात घुमू लागला आहे. जर शासन आणि प्रशासनाने आमच्या गावाला हक्काचा, सर्व सोयीसुविधांनी युक्त असा बस स्टँड दिला नाही, तर आगामी काळात मतदार आपली ताकद दाखवून सत्ताधाऱ्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत, असा थेट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

मुख्य मागण्या:

टेंभुर्णी येथे तात्काळ सुसज्ज आणि आधुनिक बस स्थानकाची उभारणी करण्यात यावी.

प्रवाशांना बसण्यासाठी शेड, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोय करावी.

महामार्गावर प्रवाशांना जीव मुठीत धरून उभे राहावे लागू नये, यासाठी सुरक्षित थांबा निर्माण करावा.

आता तरी राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री या गंभीर आणि ज्वलंत प्रश्नाची दखल घेऊन जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णीकरांना न्याय देणार का? की नेहमीप्रमाणे ही फाईलही मंत्रालयाच्या कपाटात धूळ खात पडणार? याकडे संपूर्ण जाफराबाद तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

पाणी पिऊन उपोषण मागे नाही, केवळ ‘लाड भाऊं’च्या आग्रहास्तव घोटभर पाणी; सर्व मागण्यांवर तीन दिवसांत अंमलबजावणी करा, अन्यथा…

टेंभुर्णीत वानरांचा धुमाकूळः तीन जण गंभीर जखमी, वनविभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप

अवैध धंद्यांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ‘ॲक्शन मोड’वर! खबरदार… अवैध धंदे कराल तर खावी लागेल जेलची हवा! .

वाघरुळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

गाडेगव्हाण रस्त्यावर चिखल अन् घाणीचे साम्राज्य ! शाळकरी मुलांची जीवघेणी कसरत; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष तक्रारीनंतरही तात्पुरत्या मलमपट्टीचा प्रयत्न; थेट सिमेंट रस्त्याची गावकऱ्यांची ठाम मागणी

Leave a Comment