Maharashtra Governmen: पीएम मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; अधिकाऱ्यांच्या ‘कान्स’ दौऱ्यावर बंदी
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क प्रतिनिधी मुंबई
Maharashtra Governmen: महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय
स्तरावर तातडीने काही निर्णय घेतले आहेत. सरकारी कामकाजासाठी आता प्रामुख्याने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला जाणार आहे. तसेच मंगळवारपासून सर्व सरकारी बैठका ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
[
Maharashtra Governmen: पंतप्रधान नरेंद्र
मोदी (Narendra Modi) यांनी देशवासीयांना आणि राज्य सरकारांना खर्चात काटकसर करण्याचे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
सरकारी खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारने अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर निर्बंध घालण्यास सुरुवात केली असून, यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी सरकारी प्रतिनिधी पाठवले जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी रविवारी देशाला संबोधित करताना इंधन बचतीवर भर देत नागरिकांनी पेट्रोल-डिझेलचा वापर मर्यादित ठेवावा, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्यावे तसेच इलेक्ट्रिक वाहनांचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन केले होते.
कंपन्यांनी शक्य असेल तेथे ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय द्यावा आणि अनावश्यक परदेश दौरे टाळावेत, सोने खरेदी एक वर्षांसाठी टाळावे, असेही त्यांनी म्हटले होते.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय स्तरावर तातडीने काही निर्णय घेतले आहेत. सरकारी कामकाजासाठी आता प्रामुख्याने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला जाणार आहे. तसेच मंगळवारपासून सर्व सरकारी बैठका ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे इंधन खर्चात बचत होण्यासोबतच परदेश दौऱ्यांवरील खर्चालाही आळा बसणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी सरकारी प्रतिनिधी न पाठवण्याचा निर्णय हा काटकसरीच्या धोरणाचा भाग मानला जात











